सुंदर सुविचार…
हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..
★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….
★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….
★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….
★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..
★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….
★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….
★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….
★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….
★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….
★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….
★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….
★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….
★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….
★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….
★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….
★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…
★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…
★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…
★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….
★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..
★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….
★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….
★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….
★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….
★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….
★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….
★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)