
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
मिडिल क्लास का होना भी किसी वरदान से कम नही है कभी बोरियत नहीं होती….!जिंदगी भर कुछ ना कुछ आफत लगी ही रहती है….! मिडिल क्लास वालो की स्थिति सबसे दयनीय होती है, न इन्हे तैमूर जैसा बचपन नसीब होता है न अनूप जलोटा जैसा बुढ़ापा,फिर भी अपने आप में उलझते हुए व्यस्त रहते है.!
मिडिल क्लास होने का भी अपना फायदा है । चाहे BMW का भाव बढे या AUDI का या फिर नया i phone लांच हो जाऐ, फर्क नही पङता.!
मिडिल क्लास लोगों की आधी जिंदगी तो झड़ते हुए बाल और बढ़ते हुए पेट को रोकने में ही चली जाती है…! इन घरो में पनीर की सब्जी तभी बनती है तो जब दुध गलती से फट जाता है और मिक्स-वेज की सब्ज़ी भी तभी बनती हैं जब रात वाली सब्जी बच जाती है…!
इनके यहाँ फ्रूटी, कॉल्ड ड्रिंक एक साथ तभी आते है जब घर में कोई बढिया वाला रिश्तेदार आ रहा होता है…!मिडिल क्लास वालो के कपड़ों की तरह खाने वाले चावल की भी तीन वेराईटी होती है … डेली, कैजुवल और पार्टी वाला…!
छानते समय चायपत्ती को दबा कर लास्ट बून्द तक निचोड़ लेना ही मिडिल क्लास वालो के लिऐ परमसुख की अनुभुति होती है.!
ये लोग रूम फ्रेशनर का इस्तेमाल नही करते,सीधे अगरबत्ती जला लेते है.!मिडिल क्लास भारतीय परिवार के घरों में Get together नही होता,यहां ‘सत्यनारायण भगवान की कथा’ होती है.!
इनका फैमिली बजट इतना सटीक होता है कि सैलरी अगर 31के बजाय 1 को आये तो गुल्लक फोड़ना पड़ जाता है.!
मिडिल क्लास लोगो की आधी ज़िन्दगी तो “बहुत महँगा है” बोलने में ही निकल जाती है.!
इनकी “भूख” भी होटल के रेट्स पर डिपेंड करती है दरअसल महंगे होटलों की मेन्यू-बुक में मिडिल क्लास इंसान ‘फूड-आइटम्स’ नहीं बल्कि अपनी “औकात” ढूंढ रहा होता है.!
इश्क मोहब्बत तो अमीरो के चोचलें है मिडिल क्लास वाले तो सीधे “ब्याह” करते हैं इनके जीवन में कोई वैलेंटाइन नहीं होता “जिम्मेदारियां” जिंदगी भर बजरंग-दल सी पीछे लगी रहती हैं.!
मध्यम वर्गीय दूल्हा दुल्हन भी मंच पर ऐसे बैठे रहते हैं मानो जैसे किसी भारी सदमे में हो.!अमीर शादी के बाद हनीमून पे चले जाते है और मिडिल क्लास लोगो की शादी के बाद टेंन्ट बर्तन वाले ही इनके पीछे पड़ जाते है.!
मिडिलक्लास बस ये समझ लो कि जो तेल सर पे लगाते है वही तेल मुंह पर भी रगङ लेते है.!
एक सच्चा मिडिल क्लास आदमी गीजर बंद करके तब तक नहाता रहता है जब तक कि नल से ठंडा पानी आना शुरू ना हो जाए!
रूम ठंडा होते ही AC बंद करने वाला मिडिल क्लास आदमी चंदा देने के वक्त नास्तिक हो जाता है और प्रसाद खाने के वक्त आस्तिक.!
दरअसल मिडिल-क्लास तो चौराहे पर लगी घण्टी के समान है, जिसे लूली-लगंड़ी, अंधी-बहरी, अल्पमत-पूर्णमत हर प्रकार की सरकार पूरा दम से बजाती है।
फिर भी हिम्मत करके मिडिल क्लास आदमी की पैसा बचाने की बहुत कोशिश करता हैं लेकिन बचा कुछ भी नहीं पाता। हकीकत में मिडिल मैन की हालत पंगत के बीच बैठे हुआ उस आदमी की तरह होती है जिसके पास पूड़ी-सब्जी चाहे इधर से आये,चाहे उधर से, उस तक आते-आते खत्म हो जाती है।मिडिल क्लास के सपने भी लिमिटेड होते है “टंकी भर गई है मोटर बंद करना है”। गैस पर दूध उबल गया है, चावल जल गया है
उसे सपने भी इसी टाईप के सपने आते है। 😂😂
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)
व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो.
आज कोणता खंबा आणावा ? 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो.
घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे.
मी येतो की संध्याकाळी.’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’ मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो.
मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैशे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात? तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.’याची एक पोरगी दोन वर्षांची. दुसरी तीन महिन्याची. दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’त्याच्या उत्तरानी तोंडातली थुंकीच सुकली.
दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.माझ्या घरातली दारु, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती.
निशब्द…
नितीन थोरात
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)
कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…!
काय आहे ही जिलेबी..?
जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या ताटातील हा पदार्थ कधी लोकांच्या ताटात आला, ते कळलेच नाही. एरवी सणासुदीला, लग्नसमारंभात आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ ओळखला जातो तो मुलगी झाल्यानंतर आनंद साजरा करण्याचा पदार्थ म्हणून. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवसापासून खरेतर जिलेबी खाण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल काही आगळाच. खाण्याच्या बाबतीत आपले तोंड आणि हातही आखडता न घेणा:या कोल्हापुरकरांना खाण्यासाठी एखादे निमित्तच हवे असते. जिलेबी खाणोही याला अपवाद नाही.
खरंतर, कोल्हापूर म्हटले, की आठवते तो तांबडा आणि पांढरा. परंतु आठवडय़ातून एकदा तरी यावर ताव मारणा-या कोल्हापुरातच स्वातंत्र्यदिन असो, की प्रजासत्ताक दिन, जिलेबी खाण्याचीही एक आगळीवेगळी परंपरा जपलेली आहे. कोल्हापुरात चौकाचौकात जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. मोजायचेच झाले तर त्यांची संख्या हजारावर जाते. पावशेर का होईना, जिलेबी घरात येतेच येते. मग तो कितीही गरीब असो, वा श्रीमंत. या आनंदाच्या प्रसंगी जिलेबी आवर्जून आणलीच जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. कोल्हापुरकर सण असो वा नसो, रोज सहा हजार किलो जिलेबी फस्त करतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाला तर हा आकडा 90 हजार किलोच्या घरात जातो. कोल्हापुरात आजही जिलेबी तयार करणारी 100 च्या वर दुकाने आहेत.
किरकोळ विक्री करणारे 300 हून अधिक स्टॉल्सही असतात. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी 90 हजार किलो जिलेबीची विक्री होत असते. शिवाय 80 लाखांची उलाढाल होत असते. कोल्हापुरात जिलेबी अशी उत्सवी उत्साहाने खाण्यापाठीमागे कारणही तसेच उत्सवी आहे. जिलेबी हा मोघलांचा खाद्यपदार्थ. पंचपक्वानामध्ये त्याचे स्थान. पण तेथून तो राजघराण्यातील व्यक्तींच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचला.
जिलेबीचा इतिहास
कोल्हापुरात 88 वर्षापूर्वी जिलेबी आली असावी. कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांनी सर्वप्रथम मल्लांनी कुस्ती मारली की त्यांचे तोंड गोड करण्यासाठी 88 वर्षापूर्वी जिलेबी वाटण्याची प्रथा सुरु केली, ती आजही कायम आहे. आज त्यांची चौथी पिढी म्हणजे निखिल मधुकर माळकर हे या व्यवसायात आहेत. इतकेच नव्हे तर पुण्यात आयटी क्षेत्रत नोकरी करणारे सागर माळकरही घरचा उद्योग असल्यामुळे घरच्यांना मदत म्हणून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला चार दिवस रजा काढून येत असतात. माळकरांची पाच भावंडेही याच व्यवसायात आहेत. माळकरांचे दुकान आज ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे, त्यालाच माळकर तिकटी असे नाव आहे. महानगरपालिकेची इमारत नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात आहे. शाहू महाराजांच्यानंतर राजाराम महाराजांर्पयत शाही कार्यक्रमात, कुस्तीगीरांना वाटण्यासाठी, सणासुदीला जिलेबी वाटण्याची प्रथा कायम होती. शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ सापडतो आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जिलेबीचा इतिहास हा तसा जुना आहे. राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळय़ातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत. राजघराण्यातही माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली, याचे कागद सापडले आहेत.
राजघराण्यातही महाराजांकडे रोज हजारभर रयत भोजनासाठी पंगतीला असे. त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जाते. शाहू महाराज मात्र, पंगतीला बसताना आपल्या सवंगडय़ाच्या हातातले पिठलेभाकर खात, अन त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण पंगतीने इतरांना वाढले जात. समारंभात मात्र पंचपक्वाने बनत असत. त्यासाठी सोवळेकरी असंत. माळकरांबरोबरच चोपदार हॉटेलही जिलेबीसाठी प्रसिध्द. गणपतराव कृष्णराव भोसले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी गावचे. त्यांनी शिवाजी पुतळय़ाजवळ हॉटेल टाकून तेथे जिलेबी देउ लागले. करवीरनगरी कुस्तीसाठी प्रसिध्द. त्यामुळे देशविदेशातील मल्ल येथे येत. शिवाजी पुतळय़ाजवळील चौक हा रहदारीचा. आजही आहे. तेथे गर्दी असायची. त्यामुळे पहिलवानांसाठी तेव्हा तुपातील जिलेबी, लोणी, कांदा भजी आणि चहा हे हॉटेल चोपदारचे पदार्थ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या आठवणी आज नव्वदीत असलेले हारुण शेठ, आनंदराव सूर्यवंशी, शंकरराव काटे यांच्या स्मरणात आहेत. सादीक पंजाबी आणि गामा पंजाबी या पाकिस्तानी मल्लातील कुस्तीवेळी त्यांनी चोपदार हॉटेलमध्ये जिलेबी खाल्याची आठवण श्रीकांत चोपदार सांगतात. माळकर, चोपदार यांच्याशिवाय पूर्वी उरुणकर, खत्री, ढिसाळ, विजय भुवन, सुखसागर, मिलन, आहार येथे जिलेबी मिळत असे.
सातारकरांनीही सांभाळली परंपरा
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी, क्रांतीवीरांच्या साता:यातील कृष्णा सीताराम राऊत यांनी त्यांना झालेला आनंद स्वत:पुरता ठेवला नाही. त्यांनी तब्बल 11 किलो जिलेबी सातारभर वाटली आणि हा आनंद साजरा केला. आजही ही परंपरा सातारकरांनी जपून ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनी येथे परस्परांना जिलेबी देण्याची पद्धत आहे. ही अनोखी पद्धत साता:यात सुरू करण्याचे श्रेय कृष्णा राऊत यांनाच जाते. स्वातंत्र्यानंतर वाटलेली जिलेबी सातारकरांच्या लक्षात राहिली. पुढच्यावर्षी लोकांनी यंदा जिलेबी नाही का? अशी विचारणा केली. त्यावर्षीही राऊत यांनी जिलेबी वाटली आणि पुढे 69 वर्षे सातारकरांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
अशी बनते जिलेबी..
पूर्वी केवळ रिफाईन्ड तेलातील जिलेबी उपलब्ध होती. आता काळ बदललाय. वनस्पती आणि साजुक तुपातील जिलेबींना ग्राहक पसंती देत आहेत. असे असले तरी अजूनही रिफाईन्ड तेलातील जिलेबीला मोठी मागणी आहे. जिलेबीमध्ये पनीर जिलेबी, इमरती, डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी, मावा जिलेबी असे काही प्रकार आहेत. जिलेबी किंवा पाक तयार करताना लाकडाचा वापर केला तर त्याचा स्वाद अधिक खुलतो. शुगर फ्री जिलेबीही मधुमेहींच्या रुग्णांसाठी मिळते. मात्र, त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही जिलेबी साखरेच्या पाकात न टाकता ती शुगर फ्री सिरपमध्ये टाकली जाते.
खंबीर लावणं, जिलेबीचे पीठ एक दिवस आधी भिजवले जाते. कोमट पाणी, दही आणि उच्च प्रतीचा मैदा असं एकत्न करून दह्याच्या मुरवणाप्रमाणो हे मित्नण भिजवून ठेवावे लागते. याला खंबीर लावणं असं म्हणतात. खंबीर उठणं आणि खंबीर बसणं यावर जिलेबीची चव आणि आकार अवलंबून असतो. खंबीर नीट जमलं नाही तर जिलेबी कडे धरत नाही किंवा साखरेचे पाणी शोषून घेत नाही. जिलेबी करताना 85 टक्के खंबीर आणि 15 टक्के मैदा एकत्न केले जाते. या मिश्रणाला पाणी न लागण्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी डोळय़ात अक्षरश: तेल घालून बसावं लागतं. जिलेबीचं पीठ जेवढं मुरतं तितकी छान चव जिलेबीला येते.जिलेबी तळण्यासाठी पूर्वी पंढरपूरहून जिलेबीवाले येत. एकावेळी ते तीसभर जिलेबी गोलाकार तळत असतात. अलिकडे या पंढरपूरच्या कारागीरांची संख्या रोडावली असली तरी स्थानिक कामगार मात्र तयार झालेले आहेत.
जिलेबीची कूळकथा
इसवी सनाच्या तिस:या शतकात पामिरन साम्राज्याचा राजा सेप्टिमियस ओडिनाथस याचा खून झाला. तो गेल्यानंतर त्याची दुसरी पत्नी ङोनोबिया हिच्या हाती सर्व सत्ता आली. तिने इजिप्तवर आक्रमण केले व पामिरन साम्राज्य वाढविले. लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, पॅलेस्टाईन, तुर्कस्थान हे देशही तिने स्वत:च्या अंमलाखाली आणले. नंतर ङोनोबियाने नवी शहरेही निर्माण केली. त्यापैकी जुळय़ा शहराचे नाव होते हलाबिया आणि झलाबिया. युफ्रेटिस नदीच्या काठावरील या शहरातच तिस:या किंवा चौथ्या शतकात जिलेबीचा जन्म झाला असावा. येथे एका हलवायाने मैद्याच्या आंबलेल्या पिठात अंडी घालून कुरकुरीत जाळीदार गोल बिस्किटे तळून तयार केली, आणि त्यात मध सोडला आणि या नव्या पदार्थालाच आपल्या शहराचे झलाबिया असे नाव दिले. हीच ती जिलेबी.सीरियातून झलाबिया उत्तर आफ्रिका आणि आखातातील देशांत पोहोचली. सण आणि आनंदाच्या प्रसंगी ही झलाबिया खाण्यात येऊ लागली. जसजसे या पदार्थाचे स्थलांतर होत गेले, तसतसे त्याचे रुपही बदलत गेले. या बिस्किटाला नंतर शामिय्या असे नाव मिळाले. शम्स हे सीरियाचे प्राचीन अरबी नाव. सीरियातून आलेला झलाबिया म्हणून तो झलाबिया शामिय्या. एका खानसाम्याने हे आंबलेले मैद्याचे पीठ तेलात तळले आणि मधात घोळले. या पदार्थाला त्याने झलाबिया मुशब्बक असे नाव दिले. यालाच आपण जिलेबी म्हणतो. या जिलेबीलाही जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. सीरियातीलच अल्पेपो या प्राचीन शहराचे हलब हे मूळ नाव, म्हणून सीरियात झलाबिया मुशब्बक, इराणमध्ये झुलबिया, टय़ुनिशिया व पॅलेस्टाईनमध्ये मुशब्बक हलब, बांगला देशात ङिालपी, भारत आणि पाकिस्तानात जलेबी किंवा जिलेबी असे नाव आहे. झलाबिया प्रथम भारतात आली ती महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तेथून तिचा प्रवास देशभर झाला. या देशांशिवाय तुर्कस्थान, ग्रीस, सायप्रस, टय़ुनिशिया, सीरिया, इराण, इराक, इजिप्त, येमेन, मोरोक्को येथेही सणासुदीला जिलेबी खातात. ऑक्सफर्ड कंपॅनियननुसार तेराव्या शतकातील अल बगदादीच्या पुस्तकात जिलेबी तयार करण्याची पध्दत असल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशशास्त्रचे अभ्यासक पी. के. गोडे यांनी 1943 मध्ये लिहिलेल्या न्यू इंडियन अॅटीक्युरी या पुस्तकात जिलेबीची रेसिपी असल्याचे नोंदविले आहे.
1450 मध्ये लिहिलेल्या प्रियामकर्णरपकवा या जैन ग्रंथात तसेच 17व्या शतकातील रघुनाथ यांनी लिहिलेल्या भोजन कुटहला या ग्रंथातही जिलेबीचा संदर्भ आहे.
तर अशी हि जिलेबी. कोल्हापूरात 26 जाने आणि 15 ऑगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात.